news लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
news लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २४ जून, २०११

खरडलेले साहित्य वाचायला वेळ आहे



माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातही मराठी साहित्य संमेलने "मुद्रित माध्यमांतील लेखन म्हणजेच साहित्य' या समीकरणातून अद्याप बाहेर आलेली नाहीत. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने माध्यमे विविधांगी झाली असून, त्यामुळे लेखनासाठी नवनवीन व्यासपीठे उपलब्ध झाली आहेत. त्याचा फायदा घेऊन अनेक जण आपली अभिव्यक्ती लेखनाद्वारे व्यक्त करीत आहेत. मात्र याची दखल संमेलनांनी घेतलेली नाही. शिक्षणाचे माहेरघर म्हणविणाऱ्या पुण्यातील संमेलनानेही या नवमाध्यमांतील लेखनाकडे पाठ फिरविली आहे."मुद्रित होऊन पुस्तकरूपाने प्रसिद्ध होते, तेच साहित्य' अशी साहित्य संमेलनांची आजपर्यंतची वाटचाल आहे. वास्तविक गेल्या दहा-बारा वर्षांत शहरांमध्ये इंटरनेट माध्यमाचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यावर मराठीतून लेखन करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. विशेषतः ब्लॉगच्या रूपाने अनुभव, कथा, कविता, ललित आदी विविध प्रकारचे लेखन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एकट्या पुणे शहरातून सुमारे 15 हजार मराठी ब्लॉग लिहिले जातात. मुंबईतही जवळपास हीच स्थिती आहे. या लेखनाची दखल साहित्य संमेलनानेही घेतली पाहिजे, अशी अपेक्षा काही "ब्लॉगर्स'नी "सकाळ'कडे व्यक्त केली. ""मी व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर. मराठीतून ब्लॉगिंग करतो आणि एका वर्षात माझा ब्लॉग एक लाख लोकांपर्यंत पोचला,'' असे पुण्याचा ब्लॉगर अनिकेत समुद्रे याने सांगितले. ""लेखन करू इच्छिणाऱ्यांना "ब्लॉग' हे अतिशय चांगले माध्यम आहे. मी कथा लिहितो. या छापून प्रकाशित करणे मला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही; पण ब्लॉगमुळे त्या कथा मला प्रसिद्ध करता येतात. त्यांना वाचकांचा चांगला प्रतिसादही मिळतो,'' हा अनुभव अनिकेतने नमूद केला. मुंबईच्या ब्लॉगर सोनल वायकुळ म्हणाल्या, "फक्त छापील पुस्तकरूपातील लेखन म्हणजे साहित्य हा नियम आता बदलला पाहिजे. "कोणत्याही माध्यमातील लेखन म्हणजे साहित्य' अशी व्यापक भूमिका साहित्य संमेलनाने घेतली पाहिजे. सर्व माध्यमांतील मराठी साहित्यासाठी मध्यवर्ती व्यासपीठ, असे रूप साहित्य संमेलनाला देता येऊ शकेल. नव्या ब्लॉगर्सना साहित्यिकांच्या अनुभवांचा, त्यांच्या लिखाणातील शैलीचा फायदा होऊ शकेल.''फलटणमधील चैतन्य रुद्रभाटे याच्यासारख्या ब्लॉगर्सना याची उपयुक्तता निश्‍चितच पटते. चैतन्य इयत्ता बारावीत शिकतो आणि गेले वर्षभर ब्लॉगिंग करतो आहे. ""मला लिहायला आवडते, म्हणून ब्लॉग लिहितो,'' असे सांगणारा चैतन्य त्याच्या गावातील घडामोडींवरच फक्त ब्लॉगवर लिहितो.दरम्यान, या ब्लॉगर्सची आणि ऑनलाईन माध्यमातील मराठीची दखल साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळावर घेतली असल्याचे पुण्याच्या संमेलनाच्या संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक आणि साहित्यिक संजय जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, ""संकेतस्थळाला मिळालेला प्रतिसाद भरपूर आहे. ऑनलाईन वाचकांनी आवर्जून प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. "ई प्रतिमेचा आविष्कार' या स्पर्धेलाही छान प्रतिसाद होता. संमेलनपूर्व कार्यक्रमात मराठी ब्लॉगिंगविषयी चर्चा घडविली होती.''साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांची काही दिवसांपूर्वी मराठी ब्लॉगर्सशी भेट झाली. संमेलनपूर्व परिसंवादातही ब्लॉगविषयी चर्चा झाली. स्वतः द. भि. संमेलनाच्या संकेतस्थळासाठी खास ब्लॉग लिहीत आहेत. मुद्रित माध्यमाच्या भौगोलिकतेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या "ऑनलाईन माध्यमा'ची दखल संमेलनाध्यक्षांच्या भाषणातही यावी, ही "ऑनलाइन' मराठी समुदायाची अपेक्षा आहे.

वीणाला मिळाला चित्रपट

बॉलिवूडमध्ये स्थान मिळावं यासाठी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकनं काय काय उद्योग केले, हे आता वेगळं सांगायची गरज नाही. सध्या नवीन चित्रपट पटकावण्यासाठी अनेक नायिका स्टंटबाजी करताना दिसून येतात. यात पहिला नंबर वीणानं लावला होता. पण तरीदेखील तिला एकही महत्त्वाचा चित्रपट मिळाला नव्हता. परंतु, बऱ्याच प्रतिक्षेनंतर तिला एक नवीन चित्रपट मिळालाय. निर्माते आनंद बलराज यांनी "दालमें कुछ काला है' या चित्रपटात अखेर वीणाची वर्णी लावलीय. या चित्रपटात वीणासोबत अजून कोणाला घ्यायचं याबाबत निर्णय झाला नसला तरी पदरी चित्रपट पडल्यानं वीणा भलतीच खूश आहे